कोल्हापुरातील 13 गावांमध्ये 4 दिवस पाणीकपात, पुण्यातही गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Continues below advertisement
कोल्हापुरातील 13 गावांमध्ये उद्यापासून 4 दिवस तर गुरूवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कोल्हापुरातील काणेरीवाडीजवळ जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी वाहिनी बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहील.
तर पुण्यातील पर्वती जलकेंद्रासह 4 पंपिंग स्टेशन दुरूस्तीसाठी बंद करण्यात आल्यानं पाणीपुरवठा होणार नाहीये.
त्यामुळे गुरूवारसोबतच शुक्रवारीही काही भागांमध्ये कमी-जास्त दाबानं पाणी येईल.
कोल्हापुरातील गांधीनगर, मुडशिंगी, शांतीनगरसह 13 गावांमध्ये पुढचे चार दिवस पाणीपुरवठा होणार नाहीये. ऐन उकाड्यात पाणीपुरवठा होणार नसल्यानं लोकांचे हाल होणारेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram