औरंगाबाद : मराठा समाज आक्रमक, अग्निशमन दलाच्या गाडीची तोडफोड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्य़ाचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या कायगाव इथं आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. संतप्त जमावानं अग्निशामन दलाच्या गाडीची तोडफोड केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालीय. त्यामुळे इथं काहीकाळ तणावाचं वातावरण होतं. आता या परिसरात शांतता आहे. काल औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे.