बंगळुरु : परिवर्तन यात्रेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार निशाणा

Continues below advertisement
कर्नाटकात भाजपच्या वतीनं आयोजित परिवर्तन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.
कर्नाटकात काँग्रेस एक्झिट गेटजवळ आली आहे. देशात तब्बल ४ कोटी तर कर्नाटकार ७ लाख घरांमध्ये स्वातंत्र्यानंतर आजही वीज नाही. असं असताना केंद्रानं दिलेल्या निधीचा राज्यात योग्य वापर होतो का, असा सवाल मोदी यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच शेतकऱ्यांचे पुत्र असलेले येडीयुरप्पा जर मुख्यमंत्री झाले तर शेतकऱ्यांसाठीच्या शासनाच्या योजना योग्यरित्या राबवल्या जातील असंही मोदी म्हणालेत. मोदी यांच्या वक्तव्यावरुन कर्नाटकात भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा येडीयुरप्पा असतील हे आता स्पष्ट झालंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram