कल्याण : शहरात पाचवा 'खड्डेबळी', बाईकस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याणमध्ये गेल्या महिन्याभरात खड्ड्यांमुळे पाचवा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खड्ड्यात बाईक आदळल्यानंतर मागून आलेल्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला.
कल्याणच्या गांधारी पुलाजवळ काल रात्री हा प्रकार घडला. कल्याणजवळच्या गावात राहणारा कल्पेश जाधव बाईकवरुन चालला होता. त्याचवेळी कल्पेशची बाईक खड्ड्यात अडकून पडली.
बाईक खड्ड्यात असतानाच मागून येणार्या ट्रकने कल्पेशला धडक दिली. ट्रकखाली चिरडला गेल्यामुळे कल्पेशचा मृत्यू झाला.