कल्याण | #MeToo वर दोन्ही बाजू तपासणं गरजेचं | आदित्य ठाकरे

Continues below advertisement
मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चालणाऱ्या #मीटू मोहमेवर अखेरीस युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडलीय...
मीटू सारख्या प्रकरणात दोन्ही बाजू तपासू होणं गरजेचं आहे. तपासादरम्यान एका बाजूनचं कल नसावा असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलंय. काल डोंबिवलीत एका कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती, यावेळी ते बोलत होते.
मी टू सारख्या प्रकरणात पोलीस आणि सगळ्यांचाच कल नेहमी एका बाजूने असल्याचं पाहायला मिळतं. मात्र असं न होता दोन्ही बाजू तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram