जळगाव : मुंबई-नागपूर हायवेवर विजेची तार कोसळली, तीन बस जळून खाक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जळगावच्या नशिराबादजवळ वीजेची तार कोसळून ३ ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाल्या आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाच्या ५ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, आगीत तीनही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या या बसेस असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या घटनेनंतर मुंबई-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं वाहनधारकांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागला.