जालना : भोगावमधील 20 एकर शेतातील ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2018 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जालना-घनसावंगी तालुक्यातील भोगावमध्ये एका शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. १० शेतकऱ्यांच्या २० एकर शेतातला उस जळून खाक झालाय. शेतात विद्युत तारेची वाऱ्यामुळे स्पार्किंग झाली आणि त्यामुळे शेतातल्या उसाने पेट घेतला आणि बघता बघता ही आग आसपासच्या शेतातही पसरली. ह्या आगीत 20 एकर शेतातला ऊस आगीत भस्मसात झालाय. या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलीये.