देशाचा मूड : आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2018 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्रातील मोदी सरकारने तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे. या दरम्यान नोटाबंदी, जीएसटीसह अनेक मोठे निर्णय घेतले. आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय ठरले. याच काळात गुजरात सारखी महत्त्वाची निवडणूकही झाली. त्यामुळे आता मोदी सरकारबद्दल देशातील जनतेचं मत बदललं आहे की तेच आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्वेक्षण 7 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान झालं. यात 19 राज्यातील 175 लोकसभा मतदार संघात हे सर्वेक्षण करण्यात आलं. यात 14 हजार 336 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली.
जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्वेक्षण 7 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान झालं. यात 19 राज्यातील 175 लोकसभा मतदार संघात हे सर्वेक्षण करण्यात आलं. यात 14 हजार 336 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली.