नवी दिल्ली : रेल्वेला तीन तासाहून जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना पैसे परत
रेल्वेला यायला 3 तासांहून जास्त उशीर झाला आणि प्रवासी संबंधित ट्रेनमधून प्रवास करु शकला नाही तर त्या प्रवाशाला त्यांचे सगळे पैसे परत मिळणार आहेत. पण ज्यांनी ऑनलाईन रेल्वे तिकीट बूक केलंय त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. IRCTC च्या मार्फत ही पैसे परत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ई-तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी आयआरसीटीसीचा टीडीआर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. टीडीआर ऑप्शन सिलेक्ट केल्यावर प्रवाशाला त्याच्या तिकीटाचा पीएनआर नंबर आणि प्रवासाच्या इतर माहितीचा फॉर्म भरावा लागेल. हा ऑनलाईन फॉर्म भरल्यावर बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज प्रवाशाला मोबाईलवर येईल.