बाटलीबंद पाण्याच्या MRP बाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बॉटल एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. आधीच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका सरकारने दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली होती. मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी जागा दिली जाते, यासाठी मालकाने खर्च केलेला असतो. त्यामुळे त्यांनी एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलची विक्री केली तर आम्ही ते रोखू शकत नाही, असं न्यायालयाने निकालात म्हटलं होतं.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली होती. मात्र मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय बदलला.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी जागा दिली जाते, यासाठी मालकाने खर्च केलेला असतो. त्यामुळे त्यांनी एमआरपीपेक्षा जास्त दराने पाण्याच्या बॉटलची विक्री केली तर आम्ही ते रोखू शकत नाही, असं न्यायालयाने निकालात म्हटलं होतं.