Sanjay Raut on LokSabha : चार तासांच्या बैठकीत काय झालं?जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? राऊत म्हणाले...

मुंबई: महायुतीमध्ये कोणताही मतभेद नाही, वंचितचे आमच्यासोबत यावं आणि एकत्रित निवडणूक लढवावी अशीच तीनही पक्षांची भूमिका असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीने जागावाटपासंदर्भात प्रस्ताव दिला आहे, त्यावर सविस्तर चर्चा झाली आहे असंही ते म्हणाले. मात्र प्रकाश आंबेडकरांनी नेमका प्रस्ताव काय ठेवला याची माहिती मात्र संजय राऊतांनी दिली नाही. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola