इंजिनिअरिंगसाठी बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री विषय अनिवार्य नाही!
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
12 Mar 2021 02:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : आता आपल्याला इंजिनिअर म्हणून करियर करायचं असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय नसले तरी चालणार आहेत. तशा प्रकारचं नवं धोरण ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) जाहीर केलं आहे. त्यामुळे इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे.