अकरावी CET ला विरोध करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण,10 ऑगस्टला निर्णय देणार

मुंबई : अकरावी सीईटीला विरोध करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला आहे. आयसीएसई विद्यार्थिनीने सीईटीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने 21 ऑगस्टच्या सीईटीचं जोरदार समर्थन केलं आहे. तर सीबीएसई बोर्डाची सीईटीला हरकत नाही. मात्र, आयसीएसई बोर्डाने यावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे अकरावी सीईटीचं भविष्य 10 ऑगस्टला ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola