Dombivali Bridge | डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा धोकादायक पूल बंद करा, रेल्वेचं पत्र | ABP Majha
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल धोकादायक असल्याची बाब आयआयटी मुंबईच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आली आहे. हा उड्डाणपूल तातडीनं रहदारीसाठी बंद करा अशी मागणी रेल्वेने केडीएमसीला केली आहे. २७ मे पासून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद होणार आहे.