धुळे : धुळे हत्याकांडाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2018 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राईनपाड्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारले आहेत. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होणार नाही, मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेहांना हात लावणार नसल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं होतं.
दरम्यान, राईनपाडा गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आतापर्यंत याप्रकरणात २३ जणांना अटक झाली आहे. तर भीतीपोटी अनेक गावकऱ्यांनी गावातून पळ काढला आहे. मृत पाचही जण हे मूळ सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याच्या खवेगावातील होते.
नाथपंथीय डवरी समाजाचे असणारे हे पाचही जण काल भिक्षुकीसाठी धुळ्याच्या साक्री तालुक्यात असणाऱ्या राईनपाडा इथं आले होते.
दरम्यान, राईनपाडा गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आतापर्यंत याप्रकरणात २३ जणांना अटक झाली आहे. तर भीतीपोटी अनेक गावकऱ्यांनी गावातून पळ काढला आहे. मृत पाचही जण हे मूळ सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याच्या खवेगावातील होते.
नाथपंथीय डवरी समाजाचे असणारे हे पाचही जण काल भिक्षुकीसाठी धुळ्याच्या साक्री तालुक्यात असणाऱ्या राईनपाडा इथं आले होते.