मुंबई/उस्मानाबाद : टाटा इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्तीसह फीवाढीविरोधात आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावरुन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये सुरु असलेलं विद्यार्थी आंदोलन आता तीव्र झालं आहे. शिष्यवृत्ती मिळावी म्हणून गेल्या नऊ दिवसांपासून इथले विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई आणि तुळजापूरमधल्या संस्थेच्या महाविद्यालयामधलं कामकाज बंद पाडलं आहे. गेल्या ५ दिवसांपासून या महाविद्यालयांमध्ये कोणतंही कामकाज झालेलं नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, फी वाढ रद्द करावी, संशोधक विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी अशा या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद आणि तुळजापूरमधल्या संस्थांमध्ये एकाच वेळी हे आंदोलन सुरु आहे.
खरं तर केंद्र सरकारच्या वतीनं ही शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र मोदी सरकार आल्यापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही.
खरं तर केंद्र सरकारच्या वतीनं ही शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र मोदी सरकार आल्यापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही.