नवी दिल्ली : गांधी हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महात्मा गांधींच्या हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही. गांधींजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका, सुप्रीम कोर्टात दाखल होती.
त्याबाबत सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या अमॅकस क्युरी अर्थात न्यायालयीन मित्र अमरेंद्र शरण यांनी उत्तर दाखल करुन, गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.
अमॅकस क्युरी अमरेंद्र शरण म्हणाले, “याआधीही याप्रकरणी संपूर्ण चौकशी झाली आहे. गांधीजींच्या हत्येमागे विदेशी हात असल्याचा, दोघांनी गोळीबार केल्याचा किंवा त्यांना चार गोळ्या लागल्याच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही”
त्याबाबत सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या अमॅकस क्युरी अर्थात न्यायालयीन मित्र अमरेंद्र शरण यांनी उत्तर दाखल करुन, गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.
अमॅकस क्युरी अमरेंद्र शरण म्हणाले, “याआधीही याप्रकरणी संपूर्ण चौकशी झाली आहे. गांधीजींच्या हत्येमागे विदेशी हात असल्याचा, दोघांनी गोळीबार केल्याचा किंवा त्यांना चार गोळ्या लागल्याच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही”