भोपाळ: भय्यू महाराजांसह 5 आध्यात्म गुरुंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्यप्रदेशात नर्मदा घोटाळा रथ यात्रा काढून सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या ५ साधुंना आता चक्क राज्यमंत्रीपदाच्या दर्जाची पदं झोळीत पडली आहेत. त्यामुळे सरकारविरोधी माळ जपणाऱ्या साधुंच्या पारड्यात सरकारच्या विशेष सोयी पडणार आहेत. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कंप्युटरबाबा, भय्यू महाराज आणि पंडित योगिंद्र महंत या ५ जणांना राज्यमंत्रीपदाच्य़ा दर्जाची पदं मिळणार आहेत.
मागच्या वर्षी ६ कोटी झाडांची लागवड करण्याचं आश्वासन शिवराज सिंह चौहान सरकारनं दिलं होतं. पण यामध्ये सरकारनं घोटाळा केल्याचं म्हणत याच ५ जणांनी नर्मदा बचाव रथ यात्रेची हाक दिली होती.
पण आता नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी मध्यप्रदेश सरकारनं एक विशेष कमिटी नेमलीये. आणि त्यामध्ये या ५ जणांना विशेष दर्जा दिला गेलाय.
त्यामुळे आता या घोटाळ्याला विरोध तर दूरच तर नर्मदेचं संवर्धन कसं करता येईल, यावर सरकारी दृष्टीकोनातून चर्चा केली जाणार आहे.
मागच्या वर्षी ६ कोटी झाडांची लागवड करण्याचं आश्वासन शिवराज सिंह चौहान सरकारनं दिलं होतं. पण यामध्ये सरकारनं घोटाळा केल्याचं म्हणत याच ५ जणांनी नर्मदा बचाव रथ यात्रेची हाक दिली होती.
पण आता नर्मदा नदीच्या संवर्धनासाठी मध्यप्रदेश सरकारनं एक विशेष कमिटी नेमलीये. आणि त्यामध्ये या ५ जणांना विशेष दर्जा दिला गेलाय.
त्यामुळे आता या घोटाळ्याला विरोध तर दूरच तर नर्मदेचं संवर्धन कसं करता येईल, यावर सरकारी दृष्टीकोनातून चर्चा केली जाणार आहे.