स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : प्रदूषित नाल्याचं रुपडं पालटलं, जलबिरादरी संस्थेचा अनोखा प्रयोग
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्याला ज्या अनेक चांगल्या-वाईट गोष्टींची विशेषणं मिळालं आहे, त्यामध्ये एक विशेषण म्हणजे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून असलेली ओळख. मात्र राजेंद्र सिंह यांच्या जलबिरादरी संस्थेने एक अभिनव प्रयोग करून दाखवला आहे. ज्यामुळे महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातून येणाऱ्या अतिशय प्रदूषित रानवेंडली नाल्याचे पाणी नैसर्गिक आणि अतिशय स्वस्तात शुध्द झाले आहे.
Continues below advertisement