मुंबई : मराठा क्रांती मोर्चाला चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडेंचं शांततेचं आवाहन
Continues below advertisement
आरक्षण कोर्टाच्या हातात आहे, त्यामुळे आंदोलन करुन आणि गाड्या फोडून काय साध्य होणार असा उद्विग्न सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांना केला आहे. तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलंय. तसंच काही पेड लोक या आंदोलनात शिरले आहेत. मराठा आंदोलकांनी त्यांना खड्यासारखं बाजूला करायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Continues below advertisement