मुंबई : महापूजेच्या वादावर बुधाजीराव मुळीक आणि रघुनाथदादा पाटील यांची प्रतिक्रिया
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची मानाची विठ्ठलाची महापूजा यावर्षी मानाचे वारकरी करणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. एबीपी माझाला अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महापुजेवेळी सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसंच अन्य मंत्री उपस्थित राहतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता. ''मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकतं. काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचं काम केलं जात आहे.