ब्रेकफास्ट न्यूज : ऑपरेशन ऑल आऊट इन काश्मीर, 'सरहद'चे संस्थापक संजय नाहर यांच्याशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या 'ऑपरेशन ऑल आउट'मध्ये भारतीय जवानांना मोठं यश आलं आहे. शोपियाँमध्ये भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत हिजबुलचा दहशतवादी सद्दाम पाटरही ठार झाल्याने दहशतवादी बुरहान वाणीची गँग संपुष्टात आल्याचं बोललं जातं आहे. विशेष म्हणजे ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये मोहम्मद रफी भट्ट या प्राध्यापकाचाही समावेश आहे. रफी भट्ट याला शरणागती पत्करण्याचं आवाहन करुनही त्याने ऐकलं नाही. त्यामुळे जवानांनी त्यालाही कंठस्नान घातलं. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये बिलाल मौलवी आणि आदिल मलिकचा समावेश आहे. यादरम्यान एका नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. तर काश्मीरच्या या घटनेचं विश्लेषण करण्यासाठी सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार आपल्यासोहत आहेत..