ब्रेकफास्ट न्यूज : नवी दिल्ली : शेतकऱ्यांचं हित काँग्रेसशिवाय कुणीच जोपासलं नाही : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं हित फक्त काँग्रेसनंच जोपासलं, मोदी सरकार फक्त उद्योगपतींचं सरकार आहे, असं म्हणत राहुल गांधींनी काल एकप्रकारे आगामी निवडणुकांचं रणशिंग फुकलं. मोदी सरकारविरोधात काल दिल्लीच्या रामलिला मैदानावर काँग्रेसनं जनआक्रोश रॅली आयोजित केली. या रॅलीत देशभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते पोहोचले होते. राहुल गांधींनी यावेळी मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना देशाला एकजूट ठेवायचं असेल तर काँग्रेसला साथ देण्याचं आवाहन जनतेला केलं.