ब्रेकफास्ट न्यूज : पंतप्रधान मोदींनी मला दिलेला सल्ला स्वत: अमलात आणावा, मनमोहन सिंहांचा टोला

Continues below advertisement
उन्नाव आणि कठुआ गँगरेप प्रकरणी अनेक दिवस मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी निशाणा साधला आहे. "मोदी जो सल्ला मला देत असत, आता त्यांनी त्याच सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी," असं मनमोहन सिंह म्हणाले.

'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोंदीवर टीका करताना मनमोहन सिंह म्हणाले की, "मला आनंद आहे की मोदींनी अखेर या प्रकरणांवर मौन सोडलं. भारताच्या मुलींना न्याय मिळेल आणि दोषींना सोडणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. पण मोदी मला जो सल्ला देत असत, तो त्यांनी स्वत: फॉलो करायला हवा आणि अधिक बोलायलं हवं."

भाजप नेते तुमचा उल्लेख कायम 'मौनमोहन सिंह' असा करत असत, यावर तुम्ही काय म्हणाल असं विचारलं असता, ते म्हणाले की, "या प्रकारच्या टिप्पणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण मला वाटतं की, नरेंद्र मोदी मला कायम बोलण्याचा सल्ला देत असत, आता त्यांनी त्या सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी. माझ्या न बोलण्यावर ते कायम टीका करत होते, हे मला मीडियातून कळलं. पण जो सल्ला ते मला देत होते, त्यावर त्यांनी स्वत: अंमबजावणी करायला हवी."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram