ब्रेकफास्ट न्यूज : तृतीयपंथीयांना आरक्षणाचा किती फायदा होणार?, प्रिया पाटील यांच्याशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. चीड, धिक्कार, किळस, सहानुभूती अशा अनेक भावनांचे कटाक्ष झेलणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी ही मागणी म्हणजे जणू वाळवंटात दिसलेला जलाशयच. पण या मागणीचा नक्की फायदा त्यांना होणार आहे का.. नोकरी मिळेपर्यंतचा संघर्ष जर यातून कमी झाला तर त्यांना कितपत दिलासा मिळू शकतो की या मागणी व्यतिरिक्तही याची काही वेगळी बाजू त्यांना सांगायची आहे.. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आज किन्नरमा संस्थेच्या प्रकल्प अधिकारी प्रिया पाटील आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेविका पदासाठी उभ्या राहणाऱ्या प्रिया पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी आहेत..