ब्रेकफास्ट न्यूज : दिल्लीसह यूपी, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात धुळीचं वादळ, 41 मृत्यूमुखी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीसह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशला काल पुन्हा एकदा धुळीच्या वादळाचा फटका बसला. यात तब्बल 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. काल दुपारी दिल्लीत अचानक धुरळ्यासह वेगाने वारे वाहू लागले. पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. मात्र काही वेळातच वादळाने आक्रमक रुप धारण केलं. गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोलमडली. तर 40 हून अधिक विद्यूत पोल पडले. वाऱ्याच्या वेगाने लग्नसमारंभातली मंडपही कोसळली आहेत. आता हे वादळ ईशान्य भारताच्या दिशेकडे सरकलं आहे. तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ओदिशात जोरदार पावसाची शक्यता आहे.