ब्रेकफास्ट न्यूज | सिंचन प्रकल्प कधी पूर्ण करणार? दानवेंना शेतकऱ्यांचा सवाल
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी गोंधळ घातला.. पैठणजवळील खर्डा इथं उपसा सिंचन बैठकीचं आयोजन कऱण्यात आलं होतं. त्यावेळी शेतकऱ्यांनी रावसाहेब दानवेंना धारेवर धरत सिंचन प्रकल्प कधी पूर्ण होणार असा सवाल विचारला आणि घोषणाबाजी सुरु केली. काही वेळानंतर हा गोंधळ शांत झाला.