राज्यातल्या 1 हजारहून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा सरपंच, भाजप नेत्यांचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यभरातल्या 3 हजार 131 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. त्यापैकी 1 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सरपंच विराजमान झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन महाराष्ट्र भाजपचं अभिनंदन केलं आणि विकासाच्या अजेंड्याला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. काल ग्रामपचंयतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ग्रामीण महाराष्ट्रानं राज्यातल्या अनेक दिग्गजांना दणका दिला आहे. बीड तालुक्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्या संदीपनं धोबीपछाड दिली. तिकडे शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का बसला आहे.