ठाणे : बदलापूरमध्ये नदीच्या प्रवाहात अडकलेल्या 4 तरुणांची सुटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2018 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बदलापुरात उल्हास नदीच्या प्रवाहात अडकलेल्या चार तरुणांची अग्निशमन दलाने सुटका केलीय. बॅरेज धरण परिसरातील गुरुवारच्या मध्यरात्रीची दृश्यं आता समोर आली आहेत. हे चौघे उल्हास नदीत काल सायंकाळच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र कर्जत भागात सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली आणि हे चौघेही नदीच्या पात्रात अडकले. बचावासाठी बॅरेज धरणाच्या कठड्याचा त्यांनी आधार घेतला. या चौघांपैकी एकाने मोबाईलवरुन घरच्यांशी संपर्क साधत अडकल्याची माहिती दिली. य़ा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. मध्यरात्री १२ वाजता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. नदीचा प्रवाह प्रचंड वाढलेला असल्यानं बचवकार्यात वारंवार अडथळे येत होते. अखेर रात्री साडेतीन वाजता या चौघांना अग्निशमन दलानं रबर बोटच्या साहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं.