VIDEO | बारवी धरण परिसरात फिरायला गेलेल्या तरुणांचा अपघात, दोघांचा मृत्यू | बदलापूर | एबीपी माझा

फिरण्यासाठी गेलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांची गाडी उलटून झालेल्या अपघात 2 जणांचा मृत्यू झालाय. बदलापूरजवळच्या बारवी धरण परिसरात ही घटना घडलीय. नुपम तायडे आणि रुतिका कदम अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. उल्हासनगरच्या एसएसटी कॉलेजमधील ५ विद्यार्थी बदलापूरच्या बारवी धरण परिसरात एर्टीगा गाडी घेऊन फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुळगाव जवळ गाडी भरधाव वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघाताची तीव्रता इतकी होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात नुपम आणि रुतिका या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. यापैकी २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारांसाठी पाठवण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola