औरंगाबाद : नळ कनेक्शन तोडण्यावरुन दोन गट भिडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद शहरातील मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ तोडण्यावरुन दोन गटात वाद झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. या वादात दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.
राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत. काल संध्याकाळपासून मोतीकारंजा परिसरात वाद सुरु असल्यानं तणावाची स्थिती आहे.