औरंगाबाद : पाण्याचा टँकर आणि रिक्षाचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Continues below advertisement
औरंगाबाद पैठण रस्त्यावर पाण्याचं टँकर आणि एका अॅपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. सुदैवाने यात एक चिमुकली बचावली आहे.

पैठण रस्त्यावरील गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला. पाण्याने भरलेला टँकर औरंगाबादच्या दिशेनं येत होता. तर रिक्षा चितेगावच्या दिशेनं येत असताना हा भीषण अपघात झाला आहे.

दरम्यान, अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram