औरंगाबाद : शिवसेना खा. चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेला वाद पर्यावरण मंत्री रामदास कदमांना भोवला

Continues below advertisement
औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेला वाद पर्यावरण मंत्री रामदास कदमांना भोवला. कारण रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. मंगळवारी औरंगाबादेत रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरे विरोधात शेरेबाजी केली होती. हा वाद थेट मातोश्रीवर धडकल्यानंतर रामदास कदमांकडून औरंगाबादचं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं. दरम्यान, रामदास कदमांकडे नांदेडचं पालकमंत्री सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram