औरंगाबाद : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादेत आज पुन्हा एकदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. भारतीय विद्यार्थी मोर्चा या संघटनेनं आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. शासनाने तात्काळ नोकर भरती करावी, तलाठ्यांची पदही एमपीएससीमार्फत भरली जावीत, एमपीएससी मध्ये झालेल्या घोटाळ्यावर सरकारने कठोर कारवाई करावी अशा अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. औरंगाबादेत एमपीएससीच्या प्रश्नावरून मोर्चा निघण्याची ही तिसरी वेळ आहे.