औरंगाबाद : सलग 14 व्या दिवशी कचराकोंडीवर तोडगा काढण्यात अपयश

Continues below advertisement
आज सलग 14 व्या दिवशीही औरंगाबादच्या कचराकोंडीवर तोडगा काढण्यात अपयश आलं आहे. आज दिवसभर प्रशासनाने कचरा डेपोच्या शेजारी असलेल्या नरेगावशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी कचराबंदीवर ठाम राहिल्यानं पोलिसांच्या सुरक्षेमध्ये कचऱ्याच्या काही गाड्या रिकाम्या करण्यात आल्या. दुसरीकडे शहरातला कचरा टाकण्यासाठी जागा शोधणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱयांना अनेक गावकऱ्यांनी हुसकवून लावलं. कांचनवाडी, हनुमान टेकडी आणि पडेगाव... या प्रत्येक गावातून ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या परतवून लावल्या. यावेळी कांचनवाडी परिसरामध्ये आंदोलकांनी दगडफेकही केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram