औरंगाबाद : कचऱ्याच्या गाडीची तोडफोड, स्वच्छता निरीक्षकाला मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मागील काही महिन्यांपासून पेटलेला औरंगाबादेतला कचरा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चिखलठाणा भागात आज सकाळी ओल्या कचऱ्याची गाडी रिकामी करण्यास गेली असताना तिथल्या ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि गाडीची तोडफोड केली. शिवाय गाडीतील स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले यांना बेदम मारहाण केली. ग्रामस्थांनी बेल्टने मारहाण केल्याचं स्वच्छता निरीक्षक आठवलेंनी म्हटलं आहे. मारहाणीच्या निषेधार्थ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.