औरंगाबाद : शहरात केवळ पाच टक्केच कचरा असल्याचा पालकमंत्री दीपक सावंत यांचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद शहरात केवळ ५ टक्केच कचरा असल्याचा अजब दावा औरंगाबादचे पालकमंत्री दिपक सावंत यांनी केला आहे. शहर कचऱ्यात असताना तब्बल महिनाभरापासून शहराकडे न फिरकलेल्या पालकमंतत्र्यांनी अखेर शहरात हजेरी लावली. कचराप्रश्नी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा दावा केला. औरंगाबादचे रस्ते कचऱ्याने माखलेले असताना पालकमंत्र्यांनी असा दावा केल्यानं शहरवासीय चकीत झाले आहेत. यापुढे शहरात कचरा जाळताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही सावंत यांनी दिला.