औरंगाबाद | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुष्काळ आढावा बैठक

दीड महिन्यांपासून पावसानं ओढ दिल्यानं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील २०१ जिल्हे सध्या दुष्काळाच्या छायेत आहेत...मराठवाड्यातल्या ३ हजार गावांवर सध्या दुष्काळाचं संकट उभा ठाकलंय..विभागीय आयुक्त कार्यालयानं हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवल्यावर राज्य सरकार खडबडून जागं झालंय...औरंगाबादेत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आढावा बैठक घेण्यात येतेय..सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आपापल्या भागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीस अहवाल देण्याचे निर्देश यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola