औरंगाबाद: उघड्या नाल्यात पडून 2 दिवसात दोघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादमध्ये उघड्या नाल्यांचा प्रश्न चिघळला आहे. उघड्या नाल्यात पडून सलग २ दिवसात २ नागरिकांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी मनपा उपायुक्तांना मारहाण केली आहे.
दरम्यान आजही नाल्यात पडून आणखी एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. चेतन चोपडे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते ३८ वर्षांचे होते. चेतन आपली बुलेट गाडी घेऊन एन ६ या भागातून जात होते. मात्र त्यांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं, आणि ते उघड्या नाल्यात पडले. पावसामुळं नाल्याला पाणी आल्यानं ते वाहून गेले. नाल्यात पडून मृत्यू होण्याची औरंगाबाद शहरातली ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे याच नाल्यात २ वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही मनपानं इथं संरक्षक जाळी बसवली नाही. नाल्यात पडून मृत्यूच्या या घटनांमुळे मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण होतं आहे.
दरम्यान आजही नाल्यात पडून आणखी एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. चेतन चोपडे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते ३८ वर्षांचे होते. चेतन आपली बुलेट गाडी घेऊन एन ६ या भागातून जात होते. मात्र त्यांचं गाडीवरच नियंत्रण सुटलं, आणि ते उघड्या नाल्यात पडले. पावसामुळं नाल्याला पाणी आल्यानं ते वाहून गेले. नाल्यात पडून मृत्यू होण्याची औरंगाबाद शहरातली ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे याच नाल्यात २ वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही मनपानं इथं संरक्षक जाळी बसवली नाही. नाल्यात पडून मृत्यूच्या या घटनांमुळे मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्हं निर्माण होतं आहे.