औरंगाबाद : लग्नाच्या वरातीत झालेल्या भांडणातून तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद- शहरातील क्रांतीचौक परिसरात एका 25 वर्षीय तरूणाची गुप्तीने भोसकून हत्या करण्यात आली आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सहा महिन्यांपूर्वी लग्नाच्या वरातीत झालेल्या भांडणातून ही हत्या झाली असल्याची माहिती मिळाली आहे. आशिष साळवे असे मृत तरूणाचे नाव आहे. अविनाश जाधव आणि कुणाल जाधव यांच्यावर हत्येचा संशय वर्तवण्यात येत असून दोघेही फरार झाले आहेत. क्रांतिचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.