Article 370 | कलम 370 हटवणार, जम्मू काश्मीरचं विभाजन, मोदी सरकारच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत | ABP Majha
पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटलं जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून हालचालींना वेग आला आहे. अतिरिक्त सुरक्षादल तैनात करण्यात आलं आहे, अमरनाथ यात्रा थांबवली आहे. भाविक आणि पर्यटकांना जम्मू काश्मीरमधून तातडीने बाहेर जाण्याचा सल्ला दिला आहे. या निर्णयामुळे काश्मीरबाबत लवकरच मोठा निर्णय जाहीर होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. काश्मीरबद्दल अंदाज, अफवा आणि अटकळांचा बाजार गरम आहे. सोशल मीडियापासून देशभरात विविध चर्चा रंगल्या आहेत. जम्मू काश्मीरमधून 'कलम 35 अ' हटवलं जाणार अशी चर्चा रंगली आहे.