अमरावती : आमदार रवी राणांकडून अर्धवट उड्डापुलाचं उद्घाटन

Continues below advertisement
अमरावती शहरातल्या अर्धवट काम झालेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याचा अजब प्रकार आमदार रवी राणांनी केलाय. शहरातल्या राजापेठ भागातल्या उड्डाणपुलाचं काम गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे. हे काम एकाच वर्षात होणं अपेक्षित होतं. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. असं असलं तरी आमदार रवी राणांनी हनुमान जयंतीचा मुहुर्त साधून या अर्धवट पुलाचं उद्धाटनच करुन टाकलं. उद्धाटन संपताच अमरावती पोलिसांनी मात्र हा उड्डाण पुलाचा मार्ग बंद करून टाकला. आमदारांच्या या प्रतापामुळे मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram