अलिबाग : नागाव बीचवर तीन जणांचा बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2018 12:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अलिबाग येथील नागाव समुद्रकिनारी तीन जण बुडाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. तिघे मृत मुलं हे नवी मुंबईतील कोपरखैरणे इथले रहिवासी आहेत. नागाव बीचवर 13 जणांचा ग्रुप फिरायला आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीन तरुण बुडाले. चैतन्य किरण सुळे (वय 20 वर्षे), आशिष रामनारायण मिश्रा (वय 20 वर्षे) आणि फहाद सिद्धीकी (वय 21 वर्षे) अशी बुडालेल्या तिघांची नावं आहेत.