मुंबई : आकाशात विस्तारा आणि एअर इंडियाच्या विमानांची टक्कर टळली, 261 प्रवासी बचावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या आकाशात दोन विमानांची टक्कर टळल्यामुळे सुदैवाने संभाव्य अपघात घडला नाही. एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाईन्सचं विमान एकमेकांच्या जवळ आल्यामुळे हा आकाशात मोठा अपघात घडला असता. 261 प्रवाशांचे प्राण या संभाव्य अपघातातून बचावले आहेत.
काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी विमान अपघात अन्वेषण विभाग (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो - एएआयबी) ने चौकशीचे आदेश दिले आहेत.
7 फेब्रुवारी विस्तारा एअरलाईन्सचं UK 997 हे विमान 152 प्रवाशांसह दिल्लीहून पुण्याला जात होतं. त्याचवेळी एअर इंडियाच्या भोपाळला निघालेल्या AI 631 या विमानाने 109 प्रवाशांसह उड्डाण केलं. विस्ताराचं विमान एअर इंडियापासून अवघ्या 100 फूट अंतरावर आल्यामुळे मोठा अपघात घडला असता.
एअर इंडियाच्या कॅप्टनने तिच्या अहवालात विस्ताराचं विमान अवघ्या 100 फुटांवर असल्याचं लिहिलं आहे. ऑटोमॅटिक वॉर्निंगमुळे पायलटला याची माहिती मिळाली. त्यानंतर विमान सुरक्षित अंतरावर नेण्यात आल्यामुळे अपघात टळला.
काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी विमान अपघात अन्वेषण विभाग (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो - एएआयबी) ने चौकशीचे आदेश दिले आहेत.
7 फेब्रुवारी विस्तारा एअरलाईन्सचं UK 997 हे विमान 152 प्रवाशांसह दिल्लीहून पुण्याला जात होतं. त्याचवेळी एअर इंडियाच्या भोपाळला निघालेल्या AI 631 या विमानाने 109 प्रवाशांसह उड्डाण केलं. विस्ताराचं विमान एअर इंडियापासून अवघ्या 100 फूट अंतरावर आल्यामुळे मोठा अपघात घडला असता.
एअर इंडियाच्या कॅप्टनने तिच्या अहवालात विस्ताराचं विमान अवघ्या 100 फुटांवर असल्याचं लिहिलं आहे. ऑटोमॅटिक वॉर्निंगमुळे पायलटला याची माहिती मिळाली. त्यानंतर विमान सुरक्षित अंतरावर नेण्यात आल्यामुळे अपघात टळला.