अहमदनगर : कोपर्डीतील दोषींना येरवड्याला हलवा, निनावी फोनने खळबळ
कोपर्डीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींना तातडीने येरवडा कारागृहात हलवा, अशी मागणी
निनावी फोनद्वारे एका तोतयाने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपण मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे खाजगी पीए कुलकर्णी बोलत आहे. अर्ध्या तासात कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना पुण्यातील येरवडा तुरुंगात हलवा, अशी मागणी अज्ञात व्यक्तीने फोनवरुन केली. त्याचबरोबर तुमच्या कर्मचाऱ्यांना घरी सोडू नका, असंही त्याने बजावलं.
या फोनमुळे अहमदनगरच्या कारागृहात एकच खळबळ उडाली. मात्र खातरजमा केल्यावर हा फोन तोतया इसमाने केल्याचं लक्षात आलं.