अहमदनगर | निळवंडे धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणही आता ओव्हरफ्लो झाले आहे. 8300 टी.एम.सी. पाणीसाठा असलेल्या निळवंडे धरणाचा साठा 85 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या धऱण भरल्याचं जाहिर करण्यात आलं आहे. सध्या निळवंडे धरणाच्या गेटमधून साडेसात हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, निळवंडे आणि भंडारदरा हि दोन्ही धरणं भरल्यानं लाभक्षेत्रातील शेतकरी सध्या चांगलाचं सुखावला आहे.
दरम्यान, निळवंडे आणि भंडारदरा हि दोन्ही धरणं भरल्यानं लाभक्षेत्रातील शेतकरी सध्या चांगलाचं सुखावला आहे.