712 : नाशिक : संजय भारतींचा डाळिंबाच्या पट्ट्यात सदाबहार पेरुच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी
पेरु म्हणजे अनेकांच्या आवडीचं फळ. सफरचंदापेक्षा पेरुला सर्वच बाबतीत जास्त गुणकारी मानलं जातं. याच कारणानं या पेरुची बाजारातली मागणी कमी होत नाही. हेच हेरुन नाशिक जिल्ह्यातील संजय भारती या शेतकऱ्यानं ६ एकरात पेरुची लागवड केली. सेंद्रीय पद्धतीनं लागवड आणि विक्रीचं योग्य नियोजन यामुळे ही पेरुची शेती त्यांना चांगलीच फायद्याची ठरली आहे.