712 खरीपाची लगबग, पेरणीला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2018 08:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मान्सूनची चाहूल लागताच शेतकरी खरिपाची तयारी करतो. देशभरातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्याभरापासून खरिपाची तायरी सुरु केलीये. बऱ्याच शेतकऱ्यांन पेरणीलाही सुरुवात केलीये. देशभरात आतापर्यंत ५४ लाख हेक्टरवर पेरणी झालीये. गेल्या वर्षी याच काळात ५५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. रब्बी पिकांच्या काढणीला उशिर झाल्यामुळे यंदा खरिपाचा पेरा कमी झाल्याचं, कृषी विभागाचं म्हणणं आहे. आतापर्यंत भाताची पेरणी एकूण १ लाख ९ हजार हेक्टरवर झालीये. यंदा कडधान्याच्या पेरणीमध्ये मात्र घट झालीये. यंदा १६ हजार हेक्टरवर पेरणी झालीये. गेल्या वर्षी हे प्रमाण ५४ हजार हेक्टर इतकं होतं.