712 नवी दिल्ली: खाद्यतेलांवरील आयात शुल्क पुन्हा वाढवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2018 08:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क पुन्हा वाढवलेत. ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंत चौथ्यांदा सरकारने आयात शुल्कात वाढ केलीये. या निर्णयामुळे सोयाबीन आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यात सोयाबीन, सूर्यफूल, आणि मोहरी वर्गीय कच्च्या खाद्यतेलावरील आयातशुल्कात ३५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलीये. तर रीफाईंड खाद्यतेलामध्ये ४५ टक्क्यांनी वाढ करण्यात आलीये. तेलबियांचे बाजारातील घसरते दर सावरण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय.