712 : 2016 च्या दुष्काळासाठीच्या निकषांमध्ये बदल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने काही निकष लावले आहेत. त्यामध्ये 2016 साली बदल करण्यात आले आणि हे निकष अधिक जाचक बनले. राज्यभरातून या निर्णयाला मोठा विरोध झाला. त्यामुळे यात पुन्हा बदल करण्यात आलेत. यात या आधी केवळ गंभीर दुष्काळ असलेल्या भागातील शेतकऱ्यांनाच सरकारकडून मदत मिळत होती. आता मात्र मध्यम ते गंभीर दुष्काळ असलेल्या शेतकऱ्यांनाही सरकारी मदत मिळणार आहे. दुष्काळ ठरवताना पिकाची पैसेवारी ही तपासली जाणार आहे. तसंच ७५ टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाल्यासही गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात येईल. असे काही महत्त्वाचे बदल या निकषांमध्ये करण्यात आले आहे.